
क्रांतीवीर लहुजी नगर क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले जयंती संपन्न.
वाशिम: बाबासाहेब गोपले भवन क्रांतिवीर लहुजी नगर येथे लोकनेते क्रांतीसम्राट बाबासाहेब साहेब यांची जयंती दि.७मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वैरागड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ तर प्रमुख उपस्थिती माणिकराव बांगर विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ, आर के पाटोळे जिल्हाध्यक्ष,जगदीश मानवतकर, टायगर सेना,पत्रकार गोवर्धन खंदारे, शालिग्राम लगड, ठेकेदार नारायण डाखोरे, ठेकेदार विजय लोंढे, गंगाधर भालेराव आरोग्य सल्लागार, देवानंद गवळीसर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते लोकनेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष भाषणात बोलताना संजय वैरागड यांनी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांचा जन्म ७ मे १९५३ साली, लातूर जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांनी अखंड आयुष्यभर बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले, अंधश्रद्धा कर्मकांडाला कडून विरोध केला, उपेक्षित वंचित असलेला घटक मातंग समाजाला वेगळे महामंडळ निर्माण करण्यासाठी, महाक्रांतिवीर सगळे अभ्यास आयोग निर्माण करण्यासाठी, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष केला, या लढ्यामध्ये त्यांनी आपल्या एकुलता एक मुलगा सुद्धा गमावला अशा महान त्यागमूर्तीचे कार्याला शत शत नमन. त्यांचे प्रेरणादायी विचार समाजाला अत्यंत गरजेचे आहेत. असे मोलाचे मार्गदर्शन संजय वैरागड यांनी केले. यावेळी रामेश्वर डोंगरे,गजानन ठोके, विठ्ठल शिंदे, नामदेव इंगोले, कृष्णा खंदारे, विठ्ठल भालेराव, अशोक बिल्लारी यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते