विरोधकांच्या आरोपांची आमदार मंगेश चव्हाण यांनी हवाच काढली ..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नाक घसून,
आरोप करणारे माफी मागणार का ? चाळीसगावकरांचा प्रश्न ?
——————————————————-
चाळीसगाव विधानसभा निवडणुकीचे मतदानासाठी अवघे तीन-चार दिवस उरले असताना आरोप प्रत्यारोप होत आहेत. चाळीसगाव मध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी विकास कामांचा झंझावात निर्माण करून जनतेच्या दरबारात मते मागितले आहेत. त्यांच्याच पक्षाच्या एका माजी कार्यकर्त्याने काही दिवसापूर्वी चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करण्याच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. तो कार्यकर्ता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्याने उबाठाचे उमेदवार हेच त्याच्या करता करविता धनी असल्याचे आता उघड झाले आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या सभेत त्यांचा चांगलाच समाचार घेतला असून त्यांच्या आरोपांची हवाच काढून घेतली आहे. तसेच केलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याने विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन नाक घासून माफी मागावी असे देखील त्यांनी जाहीर आवाहन दिले असल्याने आता आरोप करणारे याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून माफी मागणार काय ? असा संतप्त सवाल चाळीसगावकर जनता विचारत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. वास्तविक सदर कामाची प्रशासकीय मान्यता ही ५ कोटी रुपयांची असून 3 कोटी 76 लक्ष रुपयांचीच निविदा मंजूर झालेली आहे. व त्यातही राजमुद्रा शिल्प व ट्रॅफिक आयलँड संदर्भातील कामकाजावर फक्त 25 लाख रुपये खर्च झाले आहेत, उर्वरित खर्च हा स्टेशन रोड सेंट्रल बँक पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्ता जोड, रस्ता चौक काँक्रिटीकरण, गटारीचे आरसीसी पाईप, धापे, डिव्हायडर, तस्सम पेवर ब्लॉक, फुटपाट, पथदिवे ,रोड फर्निचर इत्यादी कामांसाठी करण्यात येत आहे आहे. त्यामुळे राजमुद्रा शिल्प चौकासाठी ५ कोटी खर्च झाल्याच्या आरोपाची हवाच आता निघून गेल्याने जनतेलाही विरोधक दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आहे.
त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील आता विरोधकांना प्रश्न विचारू लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करू पाहणाऱ्यांना जनता आता धडा शिकवणार ? असाही जनतेत बोलले जात आहे. दरम्यान आरोपात तथ्य नसल्याने आरोप करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नाक घासून माफी मागावी, असे जाहीर आव्हान मंगेश चव्हाण यांनी केले होते. मात्र त्यावर आरोप करणारे काहीच बोलायला तयार नाही, त्यामुळे त्यांची गोची झाली असून जनता मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भात आरोप करणाऱ्यांचा चांगला समाचार घेणार असल्याचे दिसून येत आहे. याविषयी राजकारण करना-या नेत्याविषयी चांगलीच संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्व कामांची यादी शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून खोट्या व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याचे काम उबाटा गटाकडून करण्यात येत असल्याचे आता या निमित्ताने उघड झाले आहे.
———————————————————————-