लातूर येथील अनुष्का हत्याप्रकरणी माजलगाव शहरांमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात येणार असून
पत्रकार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
माजलगाव प्रतिनिधी
लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत असलेल्या हॉस्टेलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या निरागस निष्पाप कुमारी अनुष्का किरण कुमार पाटोळे वय वर्ष 12 हिचा संशयास्पद मृत्यू घडला असून ही दुर्दैवी घटना लातूर शहर मध्ये घडले आहे अशा या संवेदन शून्य तिची आणि गुन्हेगारी मानसिकतेची भयाव परिस्थिती आहे हा मृत्यू आहे की हत्या की आत्महत्या भाग पाडले गेले यासाठी नातेवाईकांनी तपास हा निपक्ष पारदर्शक आणि वेळेमध्ये होणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं आहे परंतु चार-पाच दिवस उलटून देखील या प्रकरणात जी दिसून येणारी दिरंगाई व उदासीनता त्या परिवाराला व समाजाला अस्वस्थ करणारी आहे एका गरीब कुटुंबातील मुलगी शाळेमध्ये शिकत असताना ती शाळेच्या कर्मचारी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या संरक्षणात खाली असताना त्या विद्यार्थिनीचा मृत्यू होतो ही भाव कोणत्याही सुसंस्कृत समाजाला मान्य होऊ शकत नाही अनुष्काही एक लहान चिमुकली ती संपूर्ण समाजाच्या भविष्याची प्रतीक आहे तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल करावा किंवा त्या मध्ये दुर्लक्ष करणारे यांच्यावर देखील कटोरा कठोर कारवाई व्हावी व दोषींना शिक्षा व्हावी इत्यादीसाठी माजलगाव शहरांमध्ये संपूर्ण समाजाच्या वतीने व पत्रकार संघाच्या वतीने अनुष्काच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माजलगाव तालुक्याच्या वतीने दिनांक 11/ 1/2026 रविवार रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणाहून कॅण्डल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कॅन्डल मोर्चा शांततेत निघून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी अनुष्काच्या फोटोला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे तरी तमाम विद्यार्थी पालक व विविध संघटनांचे पदाधिकारी व्यापारी महासंघ यांनी ठीक सात वाजता उपस्थित राहावे असे आव्हान पत्रकार संघटने कडून करण्यात आले आहे